Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
pstronga title="मुंबई" href=" data-type="interlinkingkeywords"मुंबई/a :/strong मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्तीनिमित्त नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. या सत्कार सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री छगन भुजबळ, आमदार प्रवीण दरेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. या सत्काराला उत्तर देताना रामदास आठवले यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायला हवेत. पैसे लागत असतील तर दिल्लीतून आणतो, असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं. /p h2रामदास आठवले काय म्हणाले? /h2 pनरेंद्र मोदी साहेबांनी 12 वर्ष पूर्ण केलेली आहेत, अजून तीन वर्ष आहेत. माझी 13 वर्ष आणि मोदी साहेबांची 15 वर्ष पूर्ण होतील. त्यानंतर माझी 18 वर्ष मोदी साहेबांची 23 वर्ष पूर्ण होतील. कोणी किती हटवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सहजासहजी हटणार नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं. /p pरामदास आठवले म्हणाले की, आम्हाला कोणी मिटवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही सहजासहजी मिटणार नाही कारण आम्ही देशासाठी काम करतो आहोत. सर्वसामान्य माणसांसाठी, तरुण असेल महिला असतील, युवक असतील सगळ्यांसाठी आम्ही काम करतो आहोत, असं आठवले यांनी म्हटलं. /p h3लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या/h3 pरामदास आठवले पुढे म्हणाले की, आपल्या भगिनींना दरमहा पंधराशे रुपये मिळतात. 1500 रुपये हे छोट्या लोकांसाठी फार असतात. आमच्या भगिनींसाठी 1500 रुपये म्हणजे महत्वाचे आहेत, एका महिन्याला 1500 रुपये आले तर त्यांना भाजी आहे, चटणीचा खर्च आहे. अनेक छोट्या मोठ्या वस्तू घेण्यासाठी पंधराशे रुपयांची आवश्यकता आहे. a title="एकनाथ शिंदे" href=" data-type="interlinkingkeywords"एकनाथ शिंदे/a मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना महिलांना 1500 रुपये देण्याचा निर्णय झाला होता. 2100 रुपये देणार असं आपण जाहीर गेलो होतो त्यांना 21०० रुपये द्या, कमी पडत असतील तर मी दिल्लीवरुन आणतो, असं रामदास आठवले यांनी म्हटलं. माझं गणित कच्चं आहे पण राजकारणात कच्चा नाहीये, असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं. /p h3a title="देवेंद्र फडणवीस" href=" data-type="interlinkingkeywords"देवेंद्र फडणवीस/a काय म्हणाले?/h3 pमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले हे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील दिलखुलास राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी अनेक दशके एका विचाराकरिता समर्पित असे जीवन जगले, जनसामान्यांचे नेते म्हणून सातत्याने आपली राजकीय कारकीर्द चालवली, अशा भारत सरकारच्या राज्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात 10 वर्षे पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण a title="महाराष्ट्र" href=" data-type="interlinkingkeywords"महाराष्ट्र/aाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो./p piframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

